सरकारला जागे करण्यासाठी 'आक्रोश आंदोलन' : कुंजीर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर :  मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी संप आदी आंदोलनांमधून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या राज्य सरकारसमोर मांडल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीने पुणे जिल्ह्यातील कानगावमध्ये शेतकरी आक्रोश राज्यव्यापी संप सुरू केला आहे. या संपाच्या प्रचारासाठी राज्यभर दौरे सुरू केल्याची माहिती, शेतकरी आक्रोश कृती समितीचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिली.

या वेळी संभाजी दहातोंडे, विजय काकडे, संतोष नानवटे, मकरंद जुनावणे आदी उपस्थित होते. श्री. कुंजीर म्हणाले, १९८२ पासून शेती मालाला हमीभाव मिळावा ही मागणी केली जात आहे. पुणतांबे (ता. कोपरगाव) येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप करण्यात आला.

त्यावेळी या संपातील सदस्यांना कोणतीही निकष न लावता कर्जमाफी देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शासन आदेशातून कर्जमाफीचे निकष लागू करण्यात आले. हे निकष अधिकाऱ्यांना कळेनात. या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होताना दिसत नाही. म्हणून कानगावच्या शेतकऱ्यांनी शेतकरी आक्रोश कृती समिती स्थापन करून गुरुवारपासून (ता.२) शेतकरी आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नाही. कृती समितीच्या शिष्टमंडळात गावातील पाच ग्रामस्थांसह सहा ते आठ जणांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ राज्य सरकारशी बोलणी करण्यासाठी जाणार नसून राज्य सरकारच्या प्रतिनिधींनीच गावासमोर येऊन मागणीसंदर्भात ग्रामसभेत शिष्टमंडळाशी बोलावे, असे श्री. कुंजीर यांनी सांगितले.

सध्या शेतकरी आक्रोश कृती समिती राज्यभर दौरे करत आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात १९ नोव्हेंबरला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुंजीर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com