नगर लोकसभा ‘राष्ट्रवादी’च लढणार

नगर लोकसभा ‘राष्ट्रवादी’च लढणार
नगर लोकसभा ‘राष्ट्रवादी’च लढणार

नगर : नगर लोकसभा मतदारसंघ काॅँग्रेसकडे घेणार असल्याचे वक्तव्य  काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ९) जनआक्रोश यात्रेमध्ये केले होते. त्यावर, आघाडीचा निर्णय केंद्रीय पातळीवरील नेते करणार आहेत. त्यातही ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द महत्त्वाचा असतो, हे मागील वीस वर्षांत सर्वांना माहीत आहे. नगर राष्ट्रवादी तुलनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा ‘राष्ट्रवादी’च लढविणार आहे. दादांचा शब्द पक्का असल्याचा निर्वाळा ‘राष्ट्रवादी’चे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

‘रयत’ संस्थेच्या कार्यक्रमासाठी पवार नगरला आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काॅँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘राज्यात दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा देऊन, तातडीने उपाययोजना करायला हव्यात. मात्र, सत्तारूढ असलेले नाकर्ते सरकार या गंभीर परिस्थितीत नियोजनासाठी तत्पर नसल्याचा आरोप पवार यांनी केला. शिवसेना पुन्हा एकदा अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्‍न ऐरणीवर आणत आहे. ते विकासाऐवजी नेहमीच भावनिक मुद्द्यांना पुढे करतात. त्यामुळे त्यांच्यात तारतम्याचा अभाव दिसत आहे. पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बीवरही संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत, आगामी ३१ जुलैपर्यंत पाणीसाठ्यांचे आरक्षण, चाऱ्याची उपलब्धता, जनावरांसाठी छावण्या आदी उपाययोजनांचे नियोजन सरकारने तातडीने करायला पाहिजे. मात्र, राज्यात सत्तारूढ असलेल्या नाकर्त्या सरकारला याचे गांभीर्य नाही. संपूर्ण राज्य भारनियमनमुक्त करण्याची ठोस भूमिका घेतली होती; मात्र यंदा ऐन सणासुदीच्या दिवसांत राज्यातील लोकांना उजेडापासून वंचित राहावे लागत आहे. या भारनियमनाच्या विरोधात शुक्रवारी (ता. १२) राज्यभर राष्ट्रवादी  काॅँग्रेस महावितरण कार्यालयांत कंदील लावून आंदोलन करील, असा इशारा पवार यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांना पुन्हा सत्तेवर येण्याचा भ्रम पवार म्हणाले, ‘दुष्काळी स्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा २०१९ नंतर मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत. गुजरातमध्ये सर्व विरोधक एक झाले असते, तर गुजरात हातचे गेले असते. कर्नाटकात काय झाले हे देशाने पाहिले आहे. पुन्हा सत्तेवर येण्याचा भ्रम असलेल्या राज्यकर्त्यांना आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर त्यांची स्थिती काय आहे हे कळेल.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com