शेतकऱ्यांचे देशव्यापी संघटन उभारून आंदोलन करणार : पटोले

नाना पटोले
नाना पटोले

भंडारा   : आजवर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याविरोधात शेतकऱ्यांचे देशव्यापी संघटन उभारून लढा पुकारला जाईल, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची किसान आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नुकतीच नियुक्‍ती केली. त्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांबाबत पटोले म्हणाले, की सरकारने शेतकऱ्यांना पीकविमा सक्‍तीचा केला. ज्या शेतकऱ्यांची इच्छा नाही, अशा शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यास सांगण्यात आले. परंतु, नुकसानभरपाई देताना मात्र सरकार व विमा कंपन्यांनी आपले हात वर केले. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहिले.

कर्जमाफी योजना राबवतानाही सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. आता पक्षाने आपल्यावर राष्ट्रीयस्तरावरील जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरात दौरे करून सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे संघटन उभारून सरकारविरोधात आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com