नाशिकला वादळी वाऱ्याचा पुन्हा मोठा फटका

नाशिकला वादळी वाऱ्याचा पुन्हा मोठा फटका
नाशिकला वादळी वाऱ्याचा पुन्हा मोठा फटका

नाशिक  : नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या वादळी वाऱ्यात सिन्नर, मालेगाव, येवला, निफाड तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह संततधार पावसाने (ता. १०) जिल्ह्यात अनेक भागांत हजेरी लावली. त्यामुळे झाडे, घराची पत्रे व शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील विंचूर येथे कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यावर असलेले ११ कांद्याचे शेड वादळाने उद्‍ध्वस्त झाले. यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे (ता. ११) पासून पुढील सूचना येईपर्यंत कांदा व धान्याचे लिलाव बंद असणार आहेत. मालेगाव तालुक्यातील आघार, दाभाडी या भागांत पावसाने दुपारनंतर हजेरी लावली. चांदवड तालुक्यात वडाळीभोई, मंगरूळ परिसरात सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. सिन्नर तालुक्यातील अडवाडी, गुळवंच, खापराळे येथील चारा छावण्यांमध्ये दोन हजारांहून अधिक जनावरे दाखल आहेत. मात्र मुसळधार पाऊस पडल्याने येथे कामकाजात मोठा व्यत्यय आला. या ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाल्याने अंधार झाला होता. 

वादळाच्या दुर्घटनेत ३ जण मृत्यूमुखी येवला तालुक्यात वादळी वारा व पावसामुळे घरांची भिंत व छत उडून गेल्याच्या २५ घटना घडल्या आहेत. यामुळे संबंधित कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नांदगावमधील सावरगावमध्ये वीज अंगावर पडून बाळू सावंत (वय ४७) यांचा मृत्यू झाला. येवल्यातील आडगाव चौथवा येथे लताबाई आहेर (४५) आणि निफाडमधील काथरगावला द्वारकाबाई रणपिसे यांचा भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com