केंद्राचे पथक करणार कपाशीची पाहणी

बोंडअळी
बोंडअळी

नागपूर ः राज्य सरकारकडून बोंड अळी संदर्भाने मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर येत्या आठवड्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण (एनडीआरएफ)चे पथक विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. एक फेब्रुवारीपासून हे पथक दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्य सरकारने बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ३० हजार रुपये, तर बागायती शेतकऱ्यांकरिता ३७ हजार रुपये प्रतिहेक्‍टर याप्रमाणे मदत दिली जाईल. त्यामध्ये प्रतिहेक्‍टर १६ हजार रुपये बियाणे कंपन्यांकडून घेतले जाणार आहेत. त्याला बियाणे कंपन्यांनी आधीच नकार दिला आहे. प्रतिहेक्‍टर ८ हजार रुपये विमा भरपाई, तर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून ६ हजार ८०० रुपये दिले जातील. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाला त्या संदर्भाने अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. त्यानुसार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पथक लवकरच विदर्भाच्या दौऱ्यावर येत असल्याचे सांगण्यात आले. एक फेब्रुवारीला हे पथक नागपूरला पोचेल. त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती व अकोला जिल्ह्यांत पथकाद्वारे नुकसानग्रस्त भागातील काही शेतांची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी होईल. त्याआधारे केंद्र सरकार मदतीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com