पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणार

पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणार
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणार

कोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात सुमारे एकशे पाच लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या कारखानदारांच्या हातात पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी आहे. कोट्यानुसार जरी विक्री केली तरी पुढील हंगामात सुमारे सत्तर लाख टन साखर शिल्लक राहू शकते. त्यामुळे पुढील हंगामात कारखान्यांवर आणखी दबाव वाढणार आहे. साखर विक्री ठप्प झाल्याने आता मे ते ऑक्टोबरअखेर जास्तीत जास्त साखर विक्री करण्याचे आव्हान आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साखर विक्री गतीने होईल, असा अंदाज कारखानदारांचा होता; पण तो फोल ठरत असल्याने कारखानादारांपुढे धोक्याची मालिका कायम आहे.   एप्रिल सुरू होऊन सप्ताहाचा कालावधी उलटला असला तरी फेब्रुवारी, मार्चच्या कोट्याची साखर विकण्यासाठी कारखानदारांची धडपड सुरू आहे; पण नियमित विक्री होत नसल्याने कारखान्यांचे गळीत हंगाम निराशेच्या गर्तेतच समाप्त होत आहेत.

पुढील हंगामात दुष्काळ गृहीत धरला तरी आणखी ७० लाख टन साखर उत्पादन होऊ शकते. ही सर्व साखर वेळेत विकून बँकेचे कर्ज व एफआरपी देण्याचे आव्हान कारखानदारांपुढे आहेत. यातून ते कसा मार्ग काढणार, याचेही उत्तर त्यांच्याकडे नाही. व्यापारी अद्यापही फारशी मागणी नोंदवत नसल्याने कारखाने हतबल आहेत.

पगार थकबाकीमुळे कामगारांत अस्वस्थता साखरेचे माहेर समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात व्यस्थापन पातळीवरही कारखान्याची वाईट अवस्था आहे. मोजक्याच चार, पाच कारखान्यांचा अपवाद वगळता बहुतांशी कारखान्यांत कर्मचाऱ्यांचा पगार सहा सहा महिने झालेला नाही. बँकेकडून मिळालेली रक्कम शेतकऱ्यांच्या बिलाला गेली. साखर विक्री नसल्याने चक्र फिरेनासे झाले आहे. यामुळे कारखान्याची अंर्तगत अर्थव्यस्था ठप्प झाली आहे. याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांचे पगार थांबण्यावर झाला आहे. जर परिस्थिती नाही सुधारली तर पुढील हंगामातही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होईल का, याबाबत साशंकताच असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. साखर उद्योगाला अडचणी आल्या आहेतच; पण यातूनही मार्ग निघणे शक्य आहे. कारखानदारांनी निर्यातीच्या पातळीवर गतीने निर्णय घेऊन साखर बाहेर काढण्यासाठी तत्पर उपाययोजना करणे गरजेचे आहे. निर्यातीसाठीचे अनुदान व अन्य लाभ मिळवण्यासाठी साखर विक्री होणे गरजेचे आहे. कारखान्यानी याकडे जास्त लक्ष द्यावे असे वाटते. असे झाले तर पुढील हंगामात काही प्रमाणात कारखानदारांना दिलासा मिळू शकतो.  - विजय औताडे, साखर तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com