निलंगा तालुक्‍यात गुऱ्हाळे सुरू

निलंगा तालुक्‍यात गुऱ्हाळे सुरू
निलंगा तालुक्‍यात गुऱ्हाळे सुरू

निलंगा, लातूर ः पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने व कारखाना नोंदीच्या काळातील ऊस उचलत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कारखान्यावर अवलंबून न राहता गुऱ्हाळे सुरू केली आहेत.

गतवर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली असल्याने उसाचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे कारखानदार व शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून प्रकल्प कोरडे आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या विंधनविहिरी व विहिरीचे पाणी आटले असल्याने काही गावांतील ऊस वाळू लागला आहे.

कारखान्याचा सभासद असूनही लागवडीची नोंद पुढे असल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. तालुक्‍यात पावसाअभावी रब्बीची पेरणी झाली नाही. त्यामुळे पशुधन जगविणेही अवघड झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे गुऱ्हाळ करण्यासाठी सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी गुळाचे गाळप सुरू केले आहे. सध्या बाजारात गुळाचे दरही चांगले असल्याने गुऱ्हाळ परवडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कारखान्याकडून सर्वच गावांमध्ये अद्याप गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. शिवाय कारखानाही जलदगतीने चालणे गरजेचे असून शेतकऱ्यांना मात्र वाळत असलेल्या उसाची चिंता लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com