राज्याची सिंचन क्षमता ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न : गडकरी

राज्यात यंदा तुरीच्या उत्पादनाबराेबरच तूर डाळ देखील माेठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ही तूर डाळ केंद्राने खरेदी करावी यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख माझ्याकडे आले हाेते. ही डाळ केंद्राने खरेदी करावी यासाठी प्रयत्नशील आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
नितीन गडकरी
नितीन गडकरी

पुणे ः राज्याची सिंचन क्षमता १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी १०८ नवीन आणि २६ जुने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहेत. यासाठी ४० हजार काेटींचा निधी मंजूर असून, २६ अपूर्ण प्रकल्पांचे काम दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी पुणे येथे शुक्रवारी (ता. १) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गडकरी बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित हाेते. 

श्री. गडकरी म्हणाले, की शेतकऱ्यांचे उत्पन्न २०१४ पर्यंत दुप्पट करण्याचे धाेरण केंद्र शासनाने अवलंबले अाहे. त्यासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान सिंचन याेजनेंतर्गत दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष लक्ष्य देण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रात १०८ नवीन सिंचन प्रकल्प सुरू केले असून, २६ रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सुमारे ४० हजार काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेले २६ सिंचन प्रकल्प येत्या दीड वर्षात पूर्ण केले जातील.

यामुळे राज्याची सिंचन क्षमता ४० टक्क्यांपर्यंत पाेचेल. तसेच, सिंचनासाठीचे पाणी आता कालव्याद्वारे देणे बंद करण्यात येणार असून, यापुढे केवळ पाइपद्वारेच पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. कालव्यांसाठी भूमिअधिग्रहण करावे लागत होते. सध्या सुरू असलेल्या पाइप प्रकल्पामुळे ६ हजार काेटी रुपयांची थेट बचत झाली आहे. ठिबक सिंचनाला प्राेत्साहन देण्यासाठीच्या अनुदान याेजनेला ५ हजार काेटींची देखील तरतूद करण्यात आल्याचे श्री. गडकरी यांनी या वेळी सांगितले.

शेतीशिवाय कुक्कुटपालन, मत्स्यपालन, बांबू लागवडीतून देखील उत्पन्नाचे स्राेत वाढविण्याच्या विविध याेजना आणल्या अाहेत. बांबू मिशनसाठी १ हजार ३०० काेटींची तरतूद करण्यात आली आहे. सागरी आणि गाेड्या पाण्यातील मत्स्यपालनातून ‘ब्ल्यू इकाेनाॅमी’ अधिक बळकट करण्यासाठी सागरमाला याेजनेतून साडेसात हजार किलाेमीटरचे सागरी किनारे आणि २० हजार किलाेमीटरच्या नदीपात्रांमध्ये मत्‍स्यपालनाला प्राेत्साहन दिले जात आहे. यासाठी १० हजार काेटींची तरतूद करण्यात आली आहे. समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ट्राॅलर देण्यात येणार आहेत. यामाध्यामातून पाच पटींनी मासेमारी वाढणार आहे, असे श्री. गडकरी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com