वीज न पोचलेल्या 111 गावांचे विद्युतीकरण प्रगतिपथावर : बावनकुळे

वीज न पोचलेल्या 111 गावांचे विद्युतीकरण प्रगतिपथावर : बावनकुळे

नागपूर  : राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार 40 हजार 959 गावांचे विद्युतीकरण झाले असून, पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या 111 गावांचे विद्युतीकरण प्रगतिपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, मनोहर भोईर सदस्यांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, की गडचिरोली जिल्ह्यातील 66 तर नंदुरबार जिल्ह्यातील 34 गावांचे विद्युतीकरण बाकी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 34 पैकी 33 गावे ही सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेली आहेत. तसेच अतिदुर्गम, डोंगराळ भागातील 7 तर पालघर, यवतमाळ, पुणे व रायगड जिल्ह्यांतील प्रत्येकी 1 अशा 111 गावांचे विद्युतीकरण होणे बाकी आहे. यापैकी 54 गावांचे विद्युतीकरण हे महावितरण कंपनीमार्फत तर 57 गावांचे विद्युतीकरण हे महाऊर्जाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे.

ऑक्‍टोबर 2017 अखेर महावितरण कंपनीमार्फत 54 पैकी 14 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले असून, महाऊर्जाद्वारे 57 पैकी 28 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गावांच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com