नवी दिल्ली ः दक्षिण भारतात पडणाऱ्या ईशान्य मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता अाहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला अाहे.
अाॅक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ईशान्य मोसमी पाऊस पडतो. विशेषतः तमिळनाडू, अांध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, केरळ अाणि कर्नाटकच्या अंतर्गत भागांत ईशान्य मोसमी पाऊस पडतो. या पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ३० टक्के एवढे असते. दक्षिणेकडील या पाच विभागांत ईशान्य मोसमी पावसाचे प्रमाण सरासरी ८९ ते १११ टक्के राहील, असे हवामान विभागाने म्हटले अाहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने तमिळनाडू अाणि केरळमधील बहुतांश भागांत दुष्काळस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या ठिकाणी पावसाची गरज अाहे.
मध्य अाणि पूर्वेकडील प्रशांत महासागरातील पृष्ठभागाचे तापमान थंड राहण्याची शक्यता अाहे. यामुळे ईशान्य मोसमी पावसाच्या कालावधीत ‘एल निनो’ची स्थिती तटस्थ राहील, असा अंदाज ‘मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम’ने व्यक्त केला अाहे.
प्रशांत महासागरात उष्ण पाण्याच्या प्रवाह (एल निनो) जेव्हा सक्रिय होतो तेव्हा त्याचा परिणाम भारतातील मॉन्सूनवर होताे. सध्या एल निनोची स्थिती तटस्थ अाहे.