सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार कर्जदारांना नोटिसा

दर पाच वर्षांतून किमान दोन वेळा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्‌भवते. त्यामुळे राज्यभर सरसकट नियोजन करण्याऐवजी प्रत्येक जिल्ह्यांसाठी ठोस नियोजन व्हावे. जेणेकरून जिल्हा बॅंकांवर आधारित असलेल्या बळिराजाच्या अडचणी सुटतील आणि बॅंकांची वसुली चांगली होईल. - किसन मोटे, सरव्यवस्थापक, सोलापूर जिल्हा बॅंक
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार कर्जदारांना नोटिसा
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार कर्जदारांना नोटिसा

सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा लाख कर्जदारांपैकी अद्यापही ४० हजार कर्जदारांची यादीच बॅंकेला प्राप्त न झाल्याने तब्बल २५३ कोटी रुपये शासनाकडे अडकले अाहेत. मार्च २०१७ मध्ये कर्ज घेऊनही जून २०१८ मध्ये कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकेने तब्बल ७० हजार कर्जदारांना वसुलीची नोटीस दिल्याचे बॅंकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान आणि दुसरीकडे कर्ज थकवून बॅंकेला अडचणीत आणलेल्यांना दीड लाखाची माफी, असा दुजाभाव केल्याने मागच्या वर्षी बॅंकेच्या ७० हजार शेतकरी कर्जदारांनी बॅंकेचे कर्जच फेडले नाही.

कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून ठप्पच आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत बॅंकेची नव्याने ८३२ कोटी रुपयांची थकबाकी वाढली आहे. त्यातच वारंवारच्या दुष्काळी परिस्थितीमुळेही कर्जवसुली स्थगित केल्याने थकबाकीत वाढ होत आहे. त्याचा परिणाम मात्र आता रब्बी हंगामात होणार आहे. पाण्याअभावी पिके संकटात आली आहेत. परिणामी, रब्बीच्या कर्जवाटपातही घट होणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे आता पुन्हा वसुलीसाठी बॅंकेला प्रयत्न करावे लागणार आहेत, असे सांगण्यात आले. त्यानुसारच या नोटिसा देण्यात येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com