हैदराबाद ः जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे दिवस कमी होत अाहेत; मात्र पावसाची तीव्रता वाढणार अाहे. त्यासाठी भूजलाचा योग्य रीतीने वापर करा, असा सल्ला भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. जे. रमेश यांनी दिला अाहे.
भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात अाला. मात्र, प्रत्यक्षात सरासरीच्या ९५ टक्के पावसाची नोंद झाली. ज्याप्रमाणे अंदाज व्यक्त केला होता; त्यानुसार जवळपास तेवढा पाऊस झाला अाहे, असा दावा त्यांनी केला अाहे.
देशात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले अाहे. कृषी मंत्रालयाच्या पीकपेरणीच्या अाकडेवारीवरून देशात चांगला पाऊस झाल्याचे दिसून येत अाहे. पीक उत्पादनाचे अंदाजही सकारात्मक अाहेत, असे श्री. रमेश यांनी म्हटले अाहे.
यंदा देशाच्या सकल अार्थिक उत्पन्नात (जीडीपी) कृषी क्षेत्राचे योगदान राहणार अाहे, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले असल्याचे त्यांनी नमूद केले अाहे. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये कमी पाऊस झाला. केरळमध्येही चांगला पाऊस झाला नाही. मात्र, यंदा या राज्यांत अपेक्षित पाऊस झाला असल्याचे ते म्हणाले.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब अाणि हरियानात कमी पाऊस झाला अाहे. उत्तर पश्चिमी भागातून मॉन्सून माघारी परतला अाहे. मात्र, अद्याप तेलंगणा, अांध्र प्रदेश अाणि कर्नाटकमधून मॉन्सूनच्या माघारी परतण्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही, असे श्री. रमेश यांनी सांगितले.