मराठवाड्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या घटली
मराठवाड्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या घटली

मराठवाड्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या घटली

औरंगाबाद  : मराठवाड्यातील टॅंकरवर तहान भागविणाऱ्या गावांची संख्या गत आठवड्याच्या तुलनेत ६० ने घटली. गेल्या आठवड्यात २०५ गावे वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. ही गावांची संख्या आता १४५ वर आली आहे.

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास ६० टक्‍केच पाउस झाला आहे. त्यातही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १२९ गावांना अजूनही टॅंकरने पाणी पुरवावे लागत आहे. गंगापूर, वैजापूर, पैठण, फुलंब्री तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळांना सामोरे जावे लागत आहे.

जालना जिल्ह्यातील १२ गावे व २ वाड्यांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यामध्ये भोकरदन व अंबड तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्‍यातील १ गाव व एका वाडीला अजूनही टॅंकरनेच पाणी पुरवावे लागत आहे. २४ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील ४२६ गावे वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवावे लागत होते. त्यानंतर त्यामध्ये २२१ गावे वाड्यांची घट झाली होती. आता पुन्हा १० सप्टेबरच्या अहवालानुसार टॅंकरची संख्या ६४ ने घटून २१९ वरून १५५ वर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू नसला तरी उस्मानाबाद तालुक्‍यात पाणीपुरवठा करण्यासाठी ३८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com