ची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी क्रांतीनंतर आर्थिक धोरण निश्चित करताना रशियाचा कित
बातम्या
येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शासनाने कांद्यास हमीभाव ठरवून द्यावा. बाजार हस्तक्षेप योजना राबवून हमीभाव व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यास द्यावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली.
येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शासनाने कांद्यास हमीभाव ठरवून द्यावा. बाजार हस्तक्षेप योजना राबवून हमीभाव व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यास द्यावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली.
राज्यासह परराज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या भावात घसरण होत आहे. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
येवला बाजार आवारात बुधवारी (ता. ५) उन्हाळ कांद्याचे भाव किमान २०० ते कमाल ६९०, तर सरासरी ४२५ रुपये, तर लाल कांद्याचे भाव किमान ४००, कमाल ९३०, तर सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल होते.
मार्च, एप्रिलमध्ये चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्याची प्रत घसरली आहे. यामुळे त्यास मागणी कमी आहे.
साठवून ठेवलेल्या कांद्यास उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले. बँका, सावकाराकडून कर्ज घेऊन शेतकऱ्याने कांद्यासारख्या नगदी पिकाचे उत्पादन घेतले. परंतु चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे दिसून येत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले आहे.
- 1 of 562
- ››