खरिपात झाला केवळ ५२ टक्के कर्जपुरवठा

खरिपात झाला केवळ ५२ टक्के कर्जपुरवठा
खरिपात झाला केवळ ५२ टक्के कर्जपुरवठा

पुणे : पीक पतपुरवठा आराखड्याच्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर देखील खरिपात केवळ ५२ टक्के कर्जवाटप बॅंकांनी केले आहे.  ‘‘राज्यात खरीप हंगामासाठी ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप करण्याची मुदत बॅंकांना होती. अंतिम अहवालानुसार खरिपासाठी फक्त १४ लाख ४५ हजार शेतक-यांना कर्ज देण्यात आले आहे. राज्य शासनाने अनेक वेळा बैठका आणि नाराजी व्यक्त करूनही ४८ टक्के निधी बॅंकांना वापरलाच नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कर्जवाटप नियोजनाच्या तीन बैठका घेण्यात आल्या. त्यानुसार खरिपासाठी ४३ हजार ८७३ कोटी रुपये कर्ज शेतक-यांना दिले जाईल, असे चित्र बॅंकांना मांडले होते. प्रत्यक्षात २२ हजार ९८० कोटी रुपये पीककर्जासाठी दिले गेले आहेत. कमी कर्जवाटप का झाले याचा जाब सरकारने न विचारल्यामुळे बॅंकांचे फावले आहे.  कर्जवाटपात जिल्हा बॅंकांची प्रगती त्यातल्या त्यात चांगली आहे. शेतक-यांना १३ हजार १९२ कोटी कर्ज वाटण्याचे उद्दिष्ट राज्यातील सहकारी जिल्हा बॅंकांना ठेवले होते. त्यात ७० टक्के प्रगती साधत जिल्हा बॅंकांनी ९ हजार २८८ कोटी रुपये पीककर्जापोटी उपलब्ध करून दिले.  राष्ट्रीय बँका मागेच "शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात नाके मुरडणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांना २७ हजार ८४९ कोटी रुपये कर्जवाटण्याचे उद्दिष्ट होते. मात्र प्रत्यक्षात १२ हजार २३१ कोटी रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ४४ टक्केच कर्ज वाटले गेले आहे,’’ अशी माहिती बॅंकांच्या सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com