संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगावात पीकविमा योजनेत केळी उत्पादकांचाच सहभाग

जळगाव : जिल्ह्यात यंदा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेसंबंधी हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ केळी उत्पादकच या योजनेत सहभागी होत असून, आजघडीला फक्त १८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या केळीसंबंधीचा विमा काढल्याची माहिती आहे.

फळ पीकविमा योजनेचा कालावधी १ नोव्हेंबर २०१७ ते ३० जुलै २०१८ पर्यंत असणार आहे. जिल्ह्यात ३१ हजार केळी उत्पादक या योजनेत सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. कर्जदार केळी उत्पादकांचे संमतीपत्रक भरून त्यांचा विमा हप्ता ज्या बॅंकेकडून पीक किंवा केळी कर्ज घतले आहे तीच बॅंक भरत आहे.

अग्रणी बॅंकेने त्यासंबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत. जेवढे केळी पीक कर्जदार अग्रणी व राष्ट्रीयीकृत बॅंकांचे आहेत तेवढेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे आहेत.

या बॅंकांनी कार्यवाही सुरू केली आहे. परंतु अनेक शेतकरी संमतीपत्र भरून देत नसल्याची माहिती आहे. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून, योजनेत सहभाग घ्यायचा असेल, तर आपले सरकार किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)मध्ये ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. किंवा नजीकच्या सहकारी किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकेत जाऊन विमा हप्ता व अर्ज भरायचा आहे. बिगर कर्जदार केळी उत्पादकांचाही फारसा प्रतिसाद लाभलेला नाही.

जिल्ह्यात डाळिंब, पेरू उत्पादकही काही संख्येत आहेत. परंतु किडी डाळिंब उत्पादक या योजनेत सहभागी झाले याची नेमकी आकडेवारी कृषी विभाग किंवा अग्रणी बॅंकेकडे नाही.

मुदत संपतेय फळ पीकविमा योजना मागील वर्षाप्रमाणे नऊ महिने कालावधीची आहे. योजनेत सहभागाची मुदत ३१ ऑक्‍टोबरपर्यंत असून, सहा हजार रुपये हेक्‍टरी विमा हप्ता शेतकऱ्याला भरायचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com