सांगली जिल्ह्यात ऊसतोडणीची केवळ सहाच यंत्रे

भविष्यात साखर कारखान्यांना यांत्रिकीकरणाची गरज आहे. कारखान्यांमध्ये यांत्रिकीकरणाचा विचार करत असताना, ५० टक्के यांत्रिकीकरण आणि ५० टक्के मजुरांच्याद्वारे कारखान्याचा हंगाम सुरू ठेवला पाहिजे. परंतु यांत्रिकीकरणाकडे जात असताना दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. - मोहनराव कदम, चेअरमन, सोनहिरा साखर कारखाना, वांगी, जि. सांगली.
ऊस तोडणी यंत्र
ऊस तोडणी यंत्र

सांगली ः सांगली जिल्ह्यात ७८ हजार हेक्टरवर ऊस असून, १५ कारखाने आहेत. मात्र सद्यःस्थितीला जिल्ह्यात केवळ सहा ऊस तोडणीसाठी यंत्रेच वापरली जात आहेत. त्यातच शासनाकडून यांत्रिकरणासाठी कारखान्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ठोस अश्या उपयायजोना केल्या जात नाहीत. जी सहा यंत्रे वापरात आहेत ती केवळ मोठ्या क्षेत्रासाठी आहेत. लहान क्षेत्रासाठी म्हणजे, एक ते चार एकरांपर्यंत यंत्रांचे संशोधनच झाले नाही. लहान यंत्रे असल्याच नक्कीच फायदा होईल, असे मत कारखानदारांनी व्यक्त केले. दरवर्षी गाळप हंगामात कारखान्यांना मजुरांची भासणारी टंचाई, टोळ्यांकडून होणारी फसवणूक यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने यांत्रिकीकरणासाठी कारखान्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. साखर कारखानेदेखील ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा विस्तार करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला जातो. ही यंत्रे दिवसाकाठी १५० टन उसाची तोडणी करतात. मात्र, यंत्रे मोठी असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीसाठी या यंत्राचा वापर करता येत नसल्याने लहान क्षेत्रासाठी यंत्र विकसित करणे गरजेचे   आहे.

यंत्रे दुरुस्ती सुविधेचा अभाव ऊसतोडणी यंत्रामध्ये कधीही बिघाड होऊ शकतो. मात्र, ही यंत्रे दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिस स्टेशनच नाहीत. यामुळे कारखान्यांचे आर्थिक नुकसानही होते. परिणामी यंत्राने तोडणीसाठी घेतलेले क्षेत्र तसेच ठेवावे लागते. ही यंत्रे दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंपनीशी संपर्क करून दुरुस्त करणाऱ्यांना बोलवावे लागते.

संशोधनासाठी पुढाकार घ्यावा ऊसतोडणी यंत्रे दहा एकरांपासून उपयुक्त आहेत. उसाच्या लहान शेतीमध्ये याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे लहान यंत्रे विकसित करण्यासाठी ऊस संशोधन केंद्र आणि वसंतदादा इन्स्टिट्यूट शुगरने पुढाकार घ्यावा, असे कारखानदारांनी व्यक्त केले. यामुळे कामगारांच्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. प्रतिक्रिया लहान क्षेत्रावरील ऊसतोडणीसाठी यंत्राची आवश्‍यकता आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनासह व्हीएसआय यांनी यंत्रे विकसित करणे गजरेचे आहे. हे यंत्र विकसित करताना योग्य किमतीचा विचार केला पाहिजे. तरच साखर कारखान्याला अशा यंत्राचा वापर करणे सोयीस्कर होईल. - वैभव नायकवडी,  अध्यक्ष, हुतात्मा साखर कारखाना वाळवा, जि. सांगली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com