पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित दर्जा मिळत नाही. परिणामी अपेक्षित दरही न मिळाल्याने संत्रा उत्पादकांवर मृग बहाराची संत्री तोडून फेकून देण्याची वेळ आली आहे. वरुड तालुक्‍यात अनेक शेतकऱ्यांनी मजुरांमार्फत संत्री तोडून फेकली आहेत. संत्रापट्टयात पाण्याअभावी बाग सुकण्याचे देखील प्रकार होत आहेत. याची दखल घेत शासनाने संत्रा उत्पादकांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आहे.

शेंदूरजनाघाट येथील राजकुमार खंडेलवाल यांच्या १७ एकर शेतात २ हजार ७०० संत्रा झाडे आहेत. या झाडांवर उत्तम असा मृगबहार धरला होता. मात्र ओलितासाठी पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांनी सुरवातीला जरुड आणि उमरखेड येथून ट्रॅक्‍टर टॅंकरच्या माध्यामातून पाणी आणत बाग जगविण्याचा प्रयत्न केला. परंतु आता तेथे देखील पाणी उपलब्ध होत नसल्याने झाडांवरील मृगबहाराची संत्रीच तोडून फेकण्याची वेळ आली आहे.

त्याकरिता त्यांनी थेट मजूर लावून हे काम सुरू केले. या १७ एकर संत्राबागेतील फळे तोडण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. चांगला दर मिळाला असता तर ५० लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न त्यांची ही बाग देऊन गेली असती. वरुड तालुक्‍यातीलच सचिन धूमटकर यांचे सात एकरांतील १७०० झाडे, पप्पू फरकाडे यांची १५ एकरांतील चार हजार झाडे, वासुदेव इंगोले यांच्या साडेतीन एकरातील साडेचारशे झाडे, ज्ञानेश्‍वर इंगोले यांनी ९ एकरांतील  १२०० झाडांवरील मृगबहाराची संत्रा फळे तोडून फेकली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com