धरणातील शेतीपंप बंद करण्याचे आदेश
धरणातील शेतीपंप बंद करण्याचे आदेश

धरणातील शेतीपंप बंद करण्याचे आदेश

नांदगाव, जि. नाशिक : नजीकच्या काळात दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले आहेत.

नांदगाव तालुक्यात यंदा नद्या-नाले कोरडेच राहिले. गिरणा धरणातून काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. माणिकपुंज धरण ७० टक्केच भरले आहे. नाग्यासाक्या धरणाच्या गढूळ असलेल्या मृत पाणीसाठ्यातून ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस येईपर्यंत ‘माणिकपुंज’वर अवलंबून राहावे लागणार आहे.

प्रांत भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे व गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी गुरुवारी (ता. ४) माणिकपुंज धरणाला भेट देऊन तेथील विजेचे शेतीपंप बंद करण्याच्या सूचना दिल्या. ‘आम्ही पंप बंद करू; परंतु नदीतून पाणी सोडले जाणार असल्यास ते सहन करणार नाही,’ असा सूर शेतकऱ्यांमधून उमटला. माणिकपुंजचे पाणी हा वादाचा विषय होऊ नये. त्याकडे तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा साठा म्हणून बघावे, अशी सामंजस्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले.

दराडे म्हणाले, ‘‘तालुक्यात पृष्ठभागावरचे पाणी स्रोत आटले आहेत. विहिरींनी आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. गिरणा धरणाचे पाणी अल्पावधीत सगळीकडे उपलब्ध करून देणे कठीण आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. कासारीच्या दोन धरणांत पाणी आहे. याशिवाय तालुक्यात इतरत्र पाणीसाठे नाहीत. माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा करू नये. वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com