सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार : मुख्यमंत्री

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार : मुख्यमंत्री
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार : मुख्यमंत्री

वाशीम : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. विषमुक्त अन्न ही आज काळाची गरज बनली आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी वाशीम येथे सेंद्रिय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त सेंद्रिय उत्पादक शेतकरी गट तयार करण्यासाठी या शेती पद्धतीला प्रोत्साहन देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सोमवारी (ता. १४) ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. 

अनसिंग येथील राजाभाऊ इंगळे मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत बीज प्रक्रिया संयंत्र मिळाले. या संयंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे धान्य जागेवरच स्वच्छ करून देण्यात येत असल्याने शेतमालाला दीडपट भाव मिळत आहे. यातून आपणास रोजगारसुद्धा उपलब्ध झाला आहे. शासनाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील शेतकरी परमेश्वर झनक म्हणाले, ‘‘काही वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. आमची शेतकरी उत्पादक कंपनी असून, जवळपास ३५० शेतकरी या कंपनीशी जोडले आहेत. यातील ५० शेतकऱ्यांनी सन २०१६-१७ या वर्षात ५० एकर क्षेत्रावर   सेंद्रिय शेती केली. आता सेंद्रिय शेतीचे क्षेत्र ३५० एकर इतके झाले आहे. उडीद, मूग, चवळी, तूर व भाजीपाला पिके घेत आहोत. 

मागील वर्षी गावाशेजारील धरणात पाणी नसल्यामुळे डाळिंबाची बाग जगविणे कठीण झाले. मात्र सामूहिक शेततळे मिळाल्यामुळे या डाळिंबाची झाडे वाचविण्यास मदत झाली, असे वाशीम तालुक्यातील धुमका येथील प्रगतिशील शेतकरी अनिल धुळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com