‘उस्मानाबाद ठरणार कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा‘

‘उस्मानाबाद ठरणार कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा‘
‘उस्मानाबाद ठरणार कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा‘

कोल्हापूर : कर्जमाफीची प्रक्रिया दिवाळीपूर्वी नक्की पूर्ण होईल; पण त्या अगोदर बॅंकांनी आपली माहिती देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बॅंकाचे काम पूर्ण होइल तिथे पहिल्यांदा कर्जमाफी होइल. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सर्वात अगोदर पूर्ण करण्याबाबत आमचे प्रयत्न सुुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. २७) येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री. पाटील म्हणाले, की मुदत वाढविल्यास संपूर्ण प्रक्रिया वाढते. यामुळे कर्जमाफी मिळण्यासही विलंब होतो. यामुळे मुदत वाढवायला नको, शिल्लक राहिलेल्यांनाही नंतर याचा लाभ देता येइल या दृष्टीने मी प्रयत्न करीत होतो. परंतु शेतकरी संघटना, व विरोधी पक्षाच्या दबावामुळे आठ दिवस प्रक्रिया लांबली. कर्जमाफीचे सॉफ्टवेअर हे पूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय माहिती देऊ शकत नाही. २२ ला प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली.

यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास शेतकऱ्यांना विलंब होत आहे. तरीही आम्ही दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उस्मानाबाद येथे मंत्री दिवाकर रावते यांनी याकामी पुढाकार घेतला असून बॅंकानी तातडीने माहिती देण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे तो कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा असेल. बॅंकानी तातडीने माहिती द्यावी, यासाठी आम्ही बॅंकाकडे माहिती देण्याचा आग्रह करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com