...अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पऱ्हाट्या आणून टाकू

हिमायनगर, जि. नांदेड ः येथे रविवारी (ता. २६) सायंकाळी आयोजित शेतकरी आसूड सभेत बोलताना आमदार बच्चू कडू.
हिमायनगर, जि. नांदेड ः येथे रविवारी (ता. २६) सायंकाळी आयोजित शेतकरी आसूड सभेत बोलताना आमदार बच्चू कडू.

हिमायतनगर, जि. नांदेड : राज्यात बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कपाशीच्या पिकांचे सर्वेक्षण येत्या सात डिसेंबरपर्यंत पू्र्ण करावे; अन्यथा सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रहार जनशक्तीतर्फे पऱ्हाट्या आणून टाकण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

रविवारी (ता. २६) सायंकाळी हिमायतनगर शेतकरी आसूड सभेत आमदार बच्चू कडू बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी प्रमोद कुदळे होते. उमाकांत तिडके, गजानन जाधव, दिलीप देशमुख, बंडु देशमुख, बालूभाऊ जवंजाळ, बालाजी बलपेवाड, अनिल कदम, प्रभू कल्याणकर, रामराव पवार, मारोती वानखेडे आदी उपस्थित होते.

आमदार कडू पुढे म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांविषयी उदासीन धोरण अवलंबित आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या नसून व्यवस्थेने पूर्व नियोजित केलेल्या हत्या आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांचा बळी शेतकरी ठरत आहे. शेतकरी, शेतमजूर आॅनलाइनच्या कचाट्यात सापडले आहेत.

येत्या सात डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा. बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कपाशीच्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात यावे; अन्यथा प्रहार जनशक्तीतर्फे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पऱ्हाटी आणून टाकली जाईल, असा इशारा आमदार कडू यांनी या वेळी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com