दुय्यम शेतमालही खरेदी करण्याची केंद्राला विनंती करणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

माजलगाव, जि. बीड : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर निवडक, चांगल्या शेतमालाचीच खरेदी करण्यात येत असून दुय्यम,  खराब माल घेतला जात नाही. शेतकऱ्यांचा दुय्यम शेतमाल थोड्या कमी दराने का होईना; पण तो खरेदी करावा, अशी विनंती करून पणन मंत्रालयामार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी श्री. पाटील यांनी रविवारी (ता. २६) येथील खरेदी केंद्राला भेट दिली. या वेळी आमदार आर. टी. देशमुख, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक जाधव, माजी सभापती नितीन नाईकनवरे, उपसभापती जयदत्त नरवडे, चंद्रकांत शेजूळ, श्रीमती पांडव उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, खरेदी केंद्रावर येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी पणन मंत्रालयामार्फत संपूर्ण मराठवाड्याचा आढावा घेण्यासाठी थेट मंत्रालयातील अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी पाठविण्यात आले आहे. काही क्षुल्लक अडचणी तत्काळ सोडविण्यात येत असून काही अडचणींबाबत केंद्र सरकारला कळविण्यात येणार आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा निवडक, चांगला शेतमालच खरेदी करण्यात येत असून दुय्यम माल नाकारण्यात येत आहे.

शेतकरी जाणूनबुजून खराब माल केंद्रावर आणत नाही, निसर्गाच्या अवकृपेने तो माल खराब होतो, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. यामुळे राज्य सरकार केंद्राला प्रस्ताव पाठवून कमी दराने का होईना; पण दुय्यम माल खरेदी करण्याबाबत विनंती करणार आहे. या वेळी शेतकऱ्यांना जिल्ह्यातून येणारे चुकीचे एसएमएस, खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था आदी अडचणी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सोडविण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com