नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप हंगामात

पैसेवारी
पैसेवारी

नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. यामुळे पैसेवारीही हंगामानुसार काढण्यात येतात. परंतु नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामातच रब्बी हंगामाची पैसेवारी काढण्यात आली आहे. प्रशासनाच्या या अजब कारभारावर आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  खरीप हंगामात येणारी पिके रब्बी हंगामात येत नाही. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. नागपूर जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी हीच दोन पिके घेतात. चार लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रात ही दोन पिके घेतली जातात. खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी डिसेंबर महिन्याच्या शेवटी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीच्या आधारे पीक परिस्थितीचा अंदाज लावण्यात येते. ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळ सदृश गावे म्हणून जाहीर करण्यात येते. त्यांना शासनाकडून काही सवलतीही देण्यात येते.   वीजबिलात ३३ टक्के सवलत, शेतसारा माफ, परीक्षा शुल्क माफच्या सवलती आहेत. यंदा खरीप हंगामात कमी पावसामुळे केंद्र शासनाकडून राज्यातील १५१ तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले. यात नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. तर राज्य शासनाकडून २६८ महसूल मंडळ दुष्काळी जाहीर करण्यात आले. यात नागपूर जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांचा समावेश आहे.  खरीप हंगामात पैसेवारी ५० पेक्षा जास्त दाखविण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याच खरीप हंगामात रब्बीचा हंगामाचीही पैसेवारी काढण्यात आली आणि सर्व गांवामध्ये पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली. रब्बीचा हंगाम खरीप नंतर असतो. असे असतानाही खरीप हंगामात रब्बी हंगामाच्या पिकांची पैसेवारी प्रशासनाकडून काढण्याचा प्रताप महसूल प्रशासनाने केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com