पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

येवला, जि. नाशिक : येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाऱ्या दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही, याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे.

उत्तर पूर्व भागात पिके करपून गेली; मात्र पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळणार या भरवशावर लाल कांदा, जनावरांसाठी चारा पिके उभी केली. तालुक्यात विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी आंदोलने केली. हे आवर्तन १५ नोव्हेंबरपर्यंत द्यावे, या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. पिके करपून जातील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत ओरड करूनसुद्धा येवलेकरांच्या पदरी काही पडले नाही. पालखेड डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करून पिके वाचवावीत. कारण १५ आॅक्टोबरचा पाणीसाठा गृहीत धरून कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाण्याचे सिंचन, बिगर सिंचन आरक्षणाचे नियोजन केले जाते; मात्र अद्यापही ते झालेले नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हेच का शेतकऱ्यांना अच्छे दिन?, असा टोला शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, अरुण जाधव, मल्हारी दराडे, शिवाजी वाघ यांनी लगावला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com