'बोंडअळीग्रस्तांना ५० हजार भरपाई द्या'

'बोंडअळीग्रस्तांना ५० हजार भरपाई द्या'
'बोंडअळीग्रस्तांना ५० हजार भरपाई द्या'

अकोला : जिल्ह्यासह संपूर्ण कापूस पट्ट्यात या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड नुकसान झाले अाहे. बियाणे कंपन्यांनी बोगस बियाणे पुरवित शेतकऱ्यांची फसवणूक केली अाहे. याची चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून किमान ५० हजार रुपये प्रत्येकी द्यावेत, अशी मागणी कृषक जागर मंचाने शासनाकडे केली अाहे.  या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की यावर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा सर्वत्र प्रादुर्भाव झाला. वास्तविक बीटी बियाणे वापरल्यानंतर बोंडअळी येणे अपेक्षित नाही. म्हणजेच बीटी बियाण्यांच्या नावाखाली बोगस बियाणे शेतकऱ्यांना पुरविण्यात अाले. हा फक्त फसवणुकीचाच प्रकार नसून, सहकारच्या साह्याने इथल्या कृषी व्यावसायिकांनी कंपन्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्यांवर घातलेला अार्थिक दरोडा अाहे. उत्पादनच न अाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले अाहे. हे नुकसान भरून निघणारे नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले; त्यापोटी एकरी किमान ५० हजार रुपये शासनाने किंवा संबंधित बियाणे पुरवठादाराने देण्याची मागणी संघटनेचे मनोज तायडे, प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, ज्ञानेश्वर सुलताने, दिलीप मोहोड, दीपक गावंडे, सय्यद वासीफ, ज्ञानेश्वर गावंडे अादींनी केली अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com