प्लॅस्टिकच्या वापराचे दुषपरिणाम, कायदा करण्यामागची कारणे, कारवाईसंबंधीची माहिती आदीविषयी फलक सर्वत्र लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत परिसरात प्लॅस्टिकबंदीचे फलक लावावेत, याबाबत जनजागृती करावी, प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी, शासकीय कार्यालयात प्लॅस्टिकचा वापर होणार नाही, यासाठी सूचना देण्यात याव्यात, तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आदी निर्देश पत्राद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीची जबाबदारी : शेळकंदे ग्रामीण भागात प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व तालुक्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत परिसरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीची आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व ग्रामपंचायतीना देण्यात आल्या आहेत, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.