रसायन विरहित फायद्याची शेती शक्य

शेतीचे प्रश्‍न मांडताना ॲग्रोवनने शेतकऱ्यांच्या मूळ समस्येला हात घातला, जमीन चांगली तर पिके चांगली, पिके चांगली तर शेतकरी आनंदी, सकस अन्न, असा सगळा हा चांगला परिणाम करणारा विषय ॲग्रोवनने हाती घेतला, त्याचा व्यापक स्वुरूपाचा चांगला परिणाम होणार आहे.इतर शेतकऱ्यांनीही ॲग्रोवनच्या या मोहिमेत, अभियानात सहभागी व्हावे. - विश्‍वासराव पाटील, प्रगतिशील शेतकरी, जळगाव
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य

भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती दुर्लक्षित आहे, हे पदोपदी जाणवते. शेतीचे सेंद्रिय कर्ब कमी झाले. त्याला कारण म्हणजे पिकांची फेरपालट न करणे, एकच पीक घेणे, फक्त पैसे देईल तेच पीक घेणे (उदा, कपाशी, केळी व इतर). शेतकरी कधी मिश्र पिके, सापळा पिके, नैसर्गिक कीड नियंत्रण याकडे मोठ्या संख्येने वळलेच नाहीत. काही मोजके शेतकरी आपापल्या परीने हे प्रयत्न करून आपली शेती समृद्ध करताना दिसून येतात. जमीन सुपीकता हा विषय विद्यापीठे, शासन, कृषी विभाग या सर्वांनी दुर्लक्षित केला, असे मत जळगाव जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी विश्‍वासराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.  मी ज्या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी शिक्षण विस्तार परिषदेत शेतकरी सदस्य होतो, त्या वेळी मी अनेकदा नैसर्गिक शेतीचे मुद्दे मांडले, त्यासाठी काय करावे, याचे आराखडे सांगितले. परंतु हा विषय तसा दुर्लक्षित राहीला. कोरडवाहू शेती, नैसर्गिक शेती यासाठी तत्कालीन सरकार, कृषी विद्यापीठाने संकल्पना प्रत्यक्षात याव्यात, यासाठी ठोस असे काम केले नाही. मी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या एनकॅप समितीवर असताना नैसर्गिक शेतीची संकल्पना मांडली होती. परंतु, शासनाने अशी ठोस तरतूद केली नाही. अलीकडे हा विषय चर्चेत आला आहे. त्यासाठी राज्याच्या कृषी विद्यापीठांमध्ये कार्यवाही सुरू झाली आहे. काम सुरू झाले, हे ठीक आहे. परंतु शेतकऱ्याच्या बांधावर ते पोचले पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीसंबंधी माहिती नाही. आपली शेती समृद्ध करण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविणाऱ्या उडीद, मूग या पिकांमध्ये शेतकऱ्यांनी रस घेतला पाहीजे. मिश्र, सापळा पिके घेतली पाहीजेत. शेतात जे तण उगते, तुरखाटी, पऱ्हाटी, केळीचे अवशेष हे न जाळता त्याचा शेतासाठीच उपयोग करावा. पाचट, कोरड्या पानांचे पिकांमध्ये आच्छादन करावे. मी २० वर्षे शेतात एक कणही रासायनिक घटक वापरले नाहीत. पण नैसर्गिक शेतीमुळे माझे उत्पादन कमी झाले, असे नाही. चांगले उत्पादन मी घेतो. - विश्‍वासराव पाटील, प्रगतिशील शेतकरी, जळगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com