परभणी : संपूर्ण परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जायकवाडी प्रकल्पातून सिंचनासाठीचा पाणीवापर कमी करणारे फेरनियोजन रद्द करण्यात यावे, २०१७ मधील खरीप हंगामातील सोयाबीन; तसेच अन्य पिकांचा विमा परतावा मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तत्काळ अदा करावा, २०१८ मधील खरीप हंगामातील पीक विमा नुकसानभरपाई ॲडव्हान्स अदा करावी. आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी प्रत्येक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासकीय खरेदी केंद्र सुरू करावीत आदी मागण्यांसह महागाई, इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बुधवारी (ता.२६) विविध पक्ष, संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींसह पुरोगामी विचारांच्या पक्ष संघटनांतर्फे भाजप सरकार विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी विविध मागण्या करण्यात आल्या.या मोर्चामध्ये माजी कृषी राज्यमंत्री तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, रविराज देशमुख, बाळासाहेब देशमुख, हरिभाऊ शेळके, रामभाऊ घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराजसिंह परिहार, बाळासाहेब जामकर, तहसीन अहमदखान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजन क्षीरसागर, शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मणराव गोळेगावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माणिक कदम आदींसह विविध पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आहेत प्रमुख मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.