यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार ८०० पोल्ट्री युनिट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासन, कृषी समृद्धी प्रकल्प आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून ८०० शेतकऱ्यांना पोल्ट्री युनिट उभे करून दिले जाणार आहेत.

कोरडवाहू क्षेत्रात कापूस व सोयाबीन यांसारखी पारंपरिक पिके घेतली जातात. परंतु शेतीपूरक व्यवसायांचा अभाव असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हे चित्र बदलावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्याकरिता ८०० शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून पोल्ट्री युनिट उभे करून दिले जाणार आहेत. त्यासाठी कृषी समृद्धी प्रकल्प, टाटा ट्रस्ट यांच्याशी करार करण्यात आला आहे. पोल्ट्री युनिट उभे राहिल्यानंतर कोंबड्यांच्या विक्रीसाठी अमरावती येथील अमृता हॅचरीज सोबत करारही करून दिला जाणार आहे.

या पाच तालुक्‍यांत उभे राहणार युनिट शेतकऱ्यांसाठीच्या या पोल्ट्री प्रकल्पात दहा कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, नेर, दारव्हा, घाटंजी, झरी या पाच तालुक्‍यांत हा प्रकल्प राबविण्यात येईल. जिल्ह्यातील आदिवासी महिलांकरिता ५०० कोंबड्यांचे एक युनिट याप्रमाणे ८०० युनिटची उभारणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. यासाठी कृषी समृद्धी प्रकल्पातून ७० तर टाटा टस्ट्र २५ टक्‍के निधी देईल. पाच टक्‍के लाभार्थी हिस्सा राहणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com