‘महावितरण’कडून वीजजोडणी खर्चाचा परतावा मिळणार : होगाडे

रोहित्र
रोहित्र

मुंबई : वीजजोडणीसाठी ग्राहकांनी भरलेल्या रकमा किंवा स्वतः केलेल्या खर्चाचा परतावा ‘महावितरण’कडून देण्यात येणार आहे. ही रक्कम सुमारे पावणेचारशे कोटी रुपये असल्याचे ‘महावितरण’ने म्हटले असून, गेल्या दहा वर्षांच्या व्याजासह या रकमा परत करण्यात येणार असल्याने ही रक्कम सातशे कोटींपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. २००५ नंतर अशा रकमा भरलेल्या सर्व ग्राहकांना वीजबिलांमधून या रकमा वळत्या करून देण्यात येणार आहेत. नवी वीजजोडणी देताना विजेचे खांब उभारणे, वीजवाहिन्या टाकणे किंवा अन्य कामांसाठी निधी नसल्याचे सांगून ‘महावितरण’ने ग्राहकांकडूनच त्याचा खर्च घेतला होता. त्यामध्ये ओआरसी (आउटराइट काँट्रिब्युशन चार्जेस), एसएलसी (सर्व्हिस लाइन चार्जेस) आणि मीटरच्या किमतीचा समावेश होता. महावितरणने ग्राहकांकडून वसूल केलेल्या या रकमांच्या विरोधात महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका सादर केली होती.  यावर २००७ मध्ये आयोगाने निकाल दिला आणि संबंधित सर्व ग्राहकांना या रकमांचा व्याजासह परतावा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महावितरणच्या वतीने या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. अखेर, सुप्रीम कोर्टानेही त्याच निकालावर शिक्कामोर्तब केले आहे. दहा वर्षांच्या या न्यायालयीन लढाईमुळे ग्राहकांना अंदाजे आठशे ते नऊशे कोटी रुपयांचा परतावा मिळेल, असे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com