पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीत

पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीत
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीत

जळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. परंतु, गावातील वीजपुरवठ्यासंबंधीच्या फिडरवरील यंत्रणेतून शेतीपंपांसाठी वीज वापर सुरू असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी आहेत. 

अनेक ठिकाणी वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. महावितरणने संबंधित ग्रामपंचायतींना थकीत वीजबिलातील काही रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या. यात काही ग्रामपंचायतींनी थकीत बिलातील किरकोळ रक्कम भरली. काही पंचायतींनी दुष्काळ व पाणीपट्टी वसुलीसंबंधीच्या अडचणी सांगून वीजबिल लवकरच भरण्याचे आश्‍वासन दिले. यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाला. 

गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी २४ तास वीज उपलब्ध असते. त्यासाठी गावठाण फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. या फिडरवरील यंत्रणेच्या माध्यमातून काही ठिकाणी शेतकरी, व्यावसायिक आपल्या कृषिपंपासाठी वीज वापर करीत आहेत. काही ठिकाणी सर्रास विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याची कूरबूर सरपंचांमध्ये आहे. यामुळे गावाला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावरील अतिरिक्त भार वाढतो. कमी दाबाने वीज मिळते. काही ठिकाणी वाढता वीजवापर व भारमान लक्षात घेता नवीन रोहित्र मंजूर झाले आहेत. परंतु ते सुरू करण्यासंबंधी कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. 

ग्रामपंचायतींच्या पाणी योजनांची वीजबिले भरण्यासाठी वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्याची परवानगी द्यावी, असा मुद्दाही काही सरपंचांनी मांडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com