शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नवाढीसाठी सरकार प्रयत्नशील

देशातील शेतकऱ्यांचे व शेतीसमोरील प्रश्नांचे निराकरण करणे आणि शेतकऱ्यांना विकासाच्या संधी देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे ही सरकारची प्राथमिकता आहे. भाजप सरकारच्या योजना या केवळ शेतकऱ्यांना शेतीत जाणवणाऱ्या अडचणी दूर करतेच; शिवाय शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी करण्यास मदत करत आहे. - रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेतले असून, विकास हेच उद्दिष्ट आहे. सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी केंद्र सरकार काम करेल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.  संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारपासून (ता. २९) सुरवात झाली. सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरू झाले. आपल्या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. तसेच सरकारच्या भविष्यातील उद्दिष्टांविषयीही माहिती दिली. या वेळी राष्ट्रपती म्हणाले, की केंद्र सरकारचे एकमेव उद्दिष्ट हे समाजाचे सशक्तीकरण करणे हेच असून, विकास हा प्रत्येक नागरिकापर्यंत पोचला पाहिजे. २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे लक्ष्य अाहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या आॅनलाइन जोडल्या आहेत. या योजनेला ई-नाम असे संबोधले जात असून, आतापर्यंत ३६ हजार कोटींच्या शेतमालाच्या उलाढाली ई-नामच्या माध्यमातून आॅनलाइन झाल्या आहेत. सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामाचे फलित म्हणजेच २७५ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले आणि जवळपास ३०० दशलक्ष टन फलोत्पादन झाले आहे. त्यामुळे देश अन्नधान्य आणि फलोत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे.  राष्ट्रपती म्हणाले...

  •  शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यावर सरकार काम करणार.
  •  शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी बाजार समित्या आॅनलाइन जोडल्या.
  •  ई-नामच्या माध्यमातून आतापर्यंत ३६ हजार कोटींची उलाढाल.
  •  सरकारच्या योजनांमुळेच अन्नधान्य २७५ दशलक्ष टन, तर फलोत्पादन ३०० दशलक्ष टनांच्या पुढे
  •  आधारच्या माध्यमातून योजना गरिबांपर्यंत पोचत आहेत. 
  •  विकासाचे फळ हे समाजातील प्रत्येक घटकाला मिळायला हवे.
  • अधिवेशन दोन दिवसांसाठी तहकूब संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारी (ता. २९) सुरवात झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आणि दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दोन दिवासांसाठी तहकूब करण्यात आल्याचे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी घोषित केले. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात ९ फेब्रुवारीपर्यंत कामकाज होईल. त्यानंतर कामकाज थांबेल व पुन्हा ५ मार्च ते ६ एप्रिल यादरम्यान संसदेचे अधिवेशन होणार आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com