दीक्षाभूमी त्याग, शांतता, मानवतेची प्रतीक ः राष्ट्रपती

योगाप्रमाणेच विपश्‍यनेलादेखील कोणत्याच धर्मासोबत जोडू नये. हे दोन्ही मानवी कल्याणासाठी अाहेत. -रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
राष्ट्रपतींच्या हस्ते विपश्‍यना ध्यान केंद्राचे उद्‍घाटन
राष्ट्रपतींच्या हस्ते विपश्‍यना ध्यान केंद्राचे उद्‍घाटन

नागपूर ः नागपुरातील दीक्षाभूमी त्याग, शांतता व मानवतेची प्रतीक असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती कोविंद यांचे शुक्रवारी (ता. २२) सकाळी नागपुरात आगमन झाले. त्यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. त्यांनी विमानतळावरून थेट दीक्षाभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार अादी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर संदेश पुस्तिकेत राष्ट्रपतींनी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या पवित्र भूमीत समाजक्रांतीचा पाया रचला. त्यांनी येथूनच संपूर्ण समाजाला प्रगतीकडे नेण्याचा संकल्प केला. ही दीक्षाभूमी त्यामुळेच त्याग, शांतता व मानवतेची प्रेरणा ठरल्याचे त्यांनी संदेश पुस्तिकेत लिहिले.

दीक्षाभूमीवर राष्ट्रपतींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी स्वागत केले. तसेच स्मारक समितीतर्फे त्यांना चांदीचे सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर रामटेक येथील जैन मंदिरात जात त्यांनी दर्शन घेतले. तेथून कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात बांधण्यात आलेल्या विपश्‍यना ध्यान केंद्राचे उद्‍घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. असुरक्षित आणि धकाधकीच्या या वातावरणात गौतम बुद्धांचे अहिंसा, करुणा व प्रेमाचे विचारच मानवी जीवनात स्थिरता आणण्यास पूरक ठरतील, असे राष्ट्रपती म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com