शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला ः डॉ. गिरधर पाटील

डॉ. गिरधर पाटील
डॉ. गिरधर पाटील

नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात अनेक प्रकारचे गुणात्मक फरक दाखवता येतील. शेतकरी व शेतीच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांतील सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला असून, शेती व शेतकऱ्यांच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे जाणवू लागले असल्याची टीका शेतकरी नेते अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांनी केली.

मंगळवारी (ता. २३) आयोजित पत्रकार परिषेदत डॉ. पाटील बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की शेती, रोजगार व व्यापार यांना रसातळाला नेणारी नोटाबंदी व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा जीएसटी, असे झटक्यात तुघलकी निर्णय घेणारे हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर येता कामा नये. ही निवडणूक कोणाला जिंकणवण्यासाठी नसून, आपल्या जिवावर उठलेल्या राक्षसापासून आपले संरक्षण करण्यासाठीची आहे.

नाशिकमध्ये तीन प्रमुख उमेदवारांपैकी एक उमेदवार अधिकृत युतीचा आहे व दुसरा भाजपचा बंडखोर अपक्ष उमेदवार आहे. हे दोघे ही शेतकरी विरोधी धोरणांचे पुरस्कर्ते असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा विचार करण्याचे काही एक कारण नाही. राहिलेल्या उमेदवाराला निवडून दिले तर शेतीत काय करायचे याचा किमान विचार तरी करता येईल; पण शेतकरी विरोधी पक्षांना मत दिले तर पुढील पिढी आपल्याला कदापिही माफ करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. या वेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. या वेळी शेतकरी प्रतिनिधी शिवाजी खैरनार, दिलीप कुवर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com