कोल्हापूर ः साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम आणि त्यावरील १५ टक्के व्याज द्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून (ता. २५) साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुगे यांनी दिली.
ते म्हणाले, की साखर उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीला चालना दिली. पहिल्यांदाच साखरेचा दर खरेदी दर निश्चित केला. शेतकऱ्यांच्या हिताचे हे निर्णय असताना कारखानदार जुनेच तुणतुणे वाजवताहेत. साखरेचे दर बाजारात वाढले आहे.
राज्य बॅंकेने साखर मूल्यांकन वाढवल्यामुळे जिल्हा बॅंकेने कारखान्यांना प्रतिक्विंटल तीन ते चार हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील ११६ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २२ पैकी ९ कारखान्यांनी एफआरपी दिली आहे. उर्वरित कारखान्यांनी एफआरपीची रक्कम द्यावी, यासाठी आम्ही या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.