पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण

‘स्वामिनाथन’प्रश्नी सरकारचे घूमजाव : पृथ्वीराज चव्हाण

जळगाव ः भाजपने देशातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाचे दर दिले जातील, त्यांना चांगले दिवस येतील, असे प्रचाराच्या वेळेस आश्‍वासन दिले होते; परंतु शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्‍वासने फोल ठरली आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या विषयावरून सरकारने घूमजाव केले असून, जनतेची फसवणूक केल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (ता. २४) येथे केली.  जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात व्हिजन २०१९ शिबिर झाले. या वेळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण, महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आमदार भाई जगताप, जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महिला आघाडीच्या ललिता पाटील आदी उपस्थित होते.   पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग करण्याचे काम या सरकारने केले. याच सरकारने आता स्वामिनाथन आयोग लागू करता येणार नाही, असे लेखी स्वरूपात सांगितले आहे. जनतेच्या डोळ्यांत सरकारने धूळफेक केली. रेल्वे अपघातांची सारखी मालिका सुरू आहे आणि या सरकारने न मागता बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणला. त्याचे कंत्राट दिले असून, या कंत्राटाची न्यायालयीन चौकशी केली जावी. या प्रकरणात सरकार खोटे बोलून काम करीत आहे. महाराष्ट्र सरकारला हकनाक बुलेट ट्रेनसाठी निधी द्यावा लागणार आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर ते फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात. जपान, इस्राईलच्या पंतप्रधान, नेत्यांना ते गुजरातेत घेऊन गेले व तेथे रोड शो केला, असेही चव्हाण म्हणाले. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे काम या सरकारने केले आहे. जनतेने या सरकारला धडा शिकवावा, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com