पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम

पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम

गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी झुगारून देत हरियाना आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाचे अवशेष अद्यापही जाळत असल्याचे चित्र समोर आले आहे. जमिनीतील पिकांचे अवशेष नष्ट करण्यासाठी सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आर्थिक साह्य मिळत नसल्याचा दावा करीत पिकांचे अवशेष जाळण्याशिवाय पर्याय नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हरियाना आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष जाळल्यामुळे या दोन राज्यांसह दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार धरत हरियाना आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना पिकांचे शेतातील अवशेष जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रदूषणाचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. पिकांचे अवशेष जाळण्यावर सरकारने बंदी घातली आहे; मात्र त्या बदल्यात शेतातील अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पंजाबमध्ये शेतातील पिकांचे अवशेष जाळण्याच्या ३३० घटना, तर हरियानात ७०१ घटना समोर आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भातपिकाचे अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये चालू वर्षी घट झाल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. भातपिकाचे अवशेष जाळण्याची शेतकऱ्यांचीही इच्छा नाही. मात्र, यासाठीचा इतर कुठलाही कमी खर्चिक पर्याय शेतकऱ्यांसमोर उपलब्ध नाही, त्यामुळे इच्छा नसतानाही त्यांना हा निर्णय घेणे भाग पडते.  - बलबीरसिंग राजेवाल, भारतीय किसान युनियन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com