शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मांडले प्रश्न

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मांडले प्रश्न
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मांडले प्रश्न

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ३) झालेल्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनींच्या प्रतिनिधींनी प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थिती, त्यांची वाटचाल, शासन, प्रशासनाकडून त्यांना अपेक्षित मदत याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे विषय विशेषज्ञ विजय कोळेकर, नाबार्डचे अधिकारी राजेंद्र महाजन, लीड बॅंक मॅनेजर प्रदीप कुतवळ, अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, कृषी व्यवसाय तज्ज्ञ आर. एस. नाईकवाडी, आत्माचे प्रकल्प संचालक पी. बी. आव्हाळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, रेशीमचे सहायक संचालक दिलीप हाके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी सातपुते यांच्यासह जवळपास चोवीस शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली. स्थापना झाली असली त्यांची वाटचाल स्थापनेमागील उद्देशाप्रमाणे होत नाही. त्यामागील नेमकी कारणे कोणती, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे नेमके प्रश्न काय याचा अंदाज बैठकीतून घेण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ७५ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. वाटचालीची माहिती देताना गत तीन वर्षांत स्थापन झालेल्या बैठकीत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या प्रक्रिया उद्योग, क्‍लिनिंग ग्रेडिंग, निर्यातीसंदर्भातील प्रयत्न, विविध उपक्रमांतून होत असलेली वार्षिक उलाढाल आदींविषयी माहिती दिली. यंत्रणा व शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये संवाद होण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी व्यवसाय तज्ज्ञ आर. एस. नाईकवाडी यांनी या बैठकीच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या असल्या तरी त्यांनी वाटचाल कशी करावी याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात यंत्रणा कमी पडल्याचे प्रकर्षाने समोर आले. शेकडो शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्यानंतर यंत्रणेकडून होणारी चालढकल, भांडवलाचे सहकार्य करण्यात बॅंकांची अनास्था, हो म्हणणे परंतु न करण्याची यंत्रणेतील वृत्ती, कर्ज मिळण्यात एनएची अडचण, मुद्रा लोन मिळावे, विजेचे प्रश्न आदींचा ऊहापोह शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसह प्रकल्प संचालक श्री. रस्तोगी यांच्यासमोर मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com