अमरावती जिल्ह्यातील ‘रब्बी` ओलाव्याअभावी संकटात

जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे संत्रा उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. तापमानात वाढ होत असल्याचा फटकादेखील संत्रा बागांना बसला आहे. रब्बी पिकांच्या लागवडीसाठीदेखील अपेक्षित आर्दता नसल्याने गहू लागवडदेखील प्रभावित होईल. - राहुल चौधरी, शेतकरी, वरुड, जि. अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील ‘रब्बी` ओलाव्याअभावी संकटात
अमरावती जिल्ह्यातील ‘रब्बी` ओलाव्याअभावी संकटात

अमरावती : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी १ लाख ६८ हजार हेक्‍टरचे क्षेत्र अपेक्षित केले असले तरी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे त्यात घट होण्याचा अंदाज आहे. सिंचन होऊ शकणारे क्षेत्र वगळता जिल्ह्यातील रब्बी क्षेत्र निम्म्यावरच येण्याची भीती आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख ६८ हजार ५४२ हेक्‍टरमध्ये लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्‍यात सर्वाधिक २४ हजार ५५२ हेक्‍टर, मोर्शी तालुक्‍यात २४ हजार ४२८, चिखलदरा ४,३४७, अमरावती ७३८०, भातकुली १५०६५, नांदगाव खंडेश्‍वर ९४३२, चांदूररेल्वे ५९३५, तिवसा ९७३४, वरुड ७१८६, अंजनगावसूर्जी १०९७४, अचलपूर ८६३४, चांदूरबाजार ७९७२ आणि धामनगाव रेल्वे तालुक्‍यात २०६३२ हेक्‍टरचा समावेश आहे. जिल्ह्यात रब्बीचे एक लाख ४१ हजार १८६ हेक्‍टरचे सरासरी क्षेत्र आहे. या तुलनेत गेल्यावर्षी एक लाख ४४ हजार १८२ हेक्‍टरवर रब्‍बीची पेरणी झाली होती.

जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत २४ टक्‍के पाऊस कमी झाला. परिणामी जमिनीत ओलावा कमी असल्याने त्याचा फटका गहू लागवड क्षेत्राला बसेल, असा अंदाज आहे. यावर्षी ५७ हजार हेक्‍टरवर गव्हाचे नियोजन आहे. जमिनीतील अत्यल्प आर्दता, कमी पर्जन्यमानामुळे विहिरींनी गाठलेला तळ, आदी कारणांमुळे गव्हाचे क्षेत्र निम्म्यावरच येण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com