वऱ्हाडात रब्बी पेरणी ६० टक्क्यांच्या खालीच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये या रब्बी हंगामात सरासरीएवढे लागवड क्षेत्र पेरणीखाली येईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. अर्धा नोव्हेंबर लोटला असून अद्यापपर्यंत अकोला, बुलडाणा, वाशीम एकाही जिल्ह्यात सरासरी ६० टक्‍क्‍यांच्या पुढे पोचले नाही. या जिल्ह्यांचे जवळपास सव्वातीन लाख हेक्‍टर रब्बी क्षेत्र असून, आतापर्यंत केवळ दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. यात प्रामुख्याने हरभऱ्याचेच क्षेत्र सर्वाधिक आहे.

सध्या लागवडीच्या बाबतीत बुलडाणा जिल्हा आघाडीवर असला, तरी याही जिल्ह्याची सरासरी ७० टक्‍क्‍यांच्या आतच आहे. अकोला जिल्हा सर्वांत नीचांकी म्हणजे अवघी ३२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या. तर वाशीमचाही असाच रब्बी हंगाम रखडला आहे. या जिल्ह्यात ४० ते ४५ टक्के क्षेत्र लागवडी खाली आले आहे.

वाशीम जिल्ह्यात हरभऱ्याचे ६० हजार ३३० हेक्‍टर सरासरी क्षेत्र असून, आतापर्यंत २८ हजार १६१ हेक्‍टरवर पेरणी झाली. ही पेरणी ५० टक्‍क्‍यांच्या आत आहे. या जिल्ह्यांचे एकूण पिकांचे सरासरी क्षेत्र ८५ हजार हेक्‍टर आहे. त्यातुलनेत आतापर्यंत अवघी ३१ हजार ६२० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

या हंगामात ऑक्‍टोबरमध्ये परतीचा पाऊस चांगला झाला. यामुळे रब्बी हंगाम चांगला होईल, असे अंदाज त्या वेळी व्यक्तही झाले होते. मात्र आताची परिस्थिती नेमकी याच्या विरुद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनीतील ओल कमी होणे, प्रकल्पांमधून रब्बीसाठी पाणी न मिळणे, खरीप पिके हातातून गेल्याने रब्बी लागवडीसाठी पैशांची व्यवस्था न होणे अशी बरीच कारणे यामागे सांगितली जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com