अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी आता रब्बी हंगामाकडे वळले आहेत. परतीचा पाऊस आणि जमिनीतील ओलाव्याअभावी जोखीम असताना या हंगामात आतापर्यंत २८ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १ लाख ६९ हजार ३४९ हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात गहू आणि हरभरा ही दोनच प्रमुख पिके आहेत. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ११ हजार २३८ हेक्‍टर तर गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ५७ हजार २९४ हेक्‍टर आहे. रब्बी ज्वारी, सुर्यफूल, करडई, मक्‍यासाठी अत्यल्प क्षेत्र प्रस्तावित आहे. जिल्ह्यात साधारणतः चांगली थंडी पडल्यानंतर गहू पिकाची पेरणी होते. दिवाळीपासून थंडीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीवर भर दिला. त्यानुसार आतापर्यंत २११० हेक्‍टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे.

हरभऱ्याचा तब्बल ४४ हजार ७५३ हेक्‍टर क्षेत्रात पेरा झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परतीचा पाऊस न झाल्याने ओलाव्याचा अभाव असताना रब्बी पेरणी जोखमीची ठरते. मात्र खरीप हातून गेल्याने ही जोखीम शेतकऱ्यांनी घेतल्याचे चित्र आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी लागवड क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्‍त करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com