नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याच्या कारणामुळे जिल्ह्यात आजवर केवळ २१ टक्‍के क्षेत्रावरच रब्बी पेरणी झाली आहे. त्यातही शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी हरभरा लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात अनेक भागांत जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नाही. बहुतांश जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे यंदा जेथे पाण्याची व्यवस्था आहे, अशाच ठिकाणी रब्बीची पिके घेण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात पावसाची सरासरी ९८८.५४ मिमी आहे. त्या तुलनेत या वर्षी ८६८.७५ मिमी इतकाच पाऊस झाला. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत १२ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही दगा दिला.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७३ हजार ५४७ हेक्‍टर असून सर्वसाधारण क्षेत्राच्या २१ टक्‍के क्षेत्रावरच आजवर पेरणी होऊ शकली. त्यामध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६८ हजार १२० हेक्‍टर असून, त्यापैकी ३० हजार ८९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीचे लागवड क्षेत्रही कमी झाले आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ९६ हजार ६५६ हेक्‍टर असून, फक्‍त ४,४७२ हेक्‍टरवरच पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com