वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः रघुनाथदादा पाटील

रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटील

यवतमाळ  ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा असणाऱ्यांनी जंगलात राहून त्यांच्याकरिता खाद्याची सोय करावी, असे सांगत वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करावा, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर २६ नोव्हेंबरला धडक देणार असल्याची माहिती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. अवनी वाघिणीने दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल १३ जणांचे बळी घेतले. वाघिणीच्या दहशतीमुळे शेतीकामांवर परिणाम झाला होता. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली. महावितरणनेदेखील कृषिपंपाला रात्री वीजपुरवठा करून या शेतकऱ्यांच्या समस्येत भर टाकण्याचे काम केले. या नरभक्षक वाघिणीला मारल्यानंतर वातानुकूलीत खोल्यांत बसून तिच्याविषयी गळा काढणारे अनेकजण समोर आले. काही ठिकाणी आंदोलनदेखील झाले. याच वाघिणीने माणसे मारली; त्यावेळी हे सारे जण कोठे होते? असा सवाल या वेळी रघुनाथदादा पाटील यांनी उपस्थित केला.

वन्यप्राणी संरक्षण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना काहीच करता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता हा कायदा रद्द करण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात केली जाईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. त्याकरिता २५ नोव्हेंबरला ठाणे येथून पदयात्रेला सुरवात होईल व २६ नोव्हेंबरला मोर्चा विधानभवनावर धडकेल. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणीदेखील यानिमित्ताने केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com