कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील १२हून अधिक ठिकाणी उष्ण लाट आली आहे. तर तापमान ४५ अंशांच्या पुढे गल्याने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, परभणी, सोलापूर, अमरावती अक्षरश: भाजून निघत आहे. बुधवारी (ता. २२) चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. उन्हामुळे होरपळ होत असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान चाळीशी पार गेल्याने, उन्हाचा ताप असह्य होत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, तर विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे उष्ण लाट आहे. ही उष्ण लाट आणखी काही दिवस कायम राहणार आहे. सायंकाळनंतर होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे कोकणातील सिंधुदूर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील लातूर आणि परिसरात आज (ता. २३) वादळी पावसाचा अंदाज हवामान आहे. बुधवारी (ता.२२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४१.१ (४.९), जळगाव ४४.० (१.७), कोल्हापूर ३७.३(२.४), महाबळेश्वर ३४.४ (५.०), नाशिक ४०.१ (२.७), सांगली ४४.४ (५.०), सातारा ४१.४ (६.७), सोलापूर ४५.१(५.१), अलिबाग ३३.९ (०.७), डहाणू ३५.१ (०.७), सांताक्रूझ ३४.० (०.५), रत्नागिरी ३२.८ (-०.१), औरंगाबाद ४२.६ (३.४), नांदेड ४४.५ (३.०), परभणी ४५.६ (३.८), उस्मानाबाद ४४.४ (५.६), अकोला ४२.२ (३.३), अमरावती ४५.० (३.०), बुलडाणा ४३.० (५.१), बह्मपुरी ४६.५ (३.९), चंद्रपूर ४६.६ (३.४), गोंदिया ४४.४ (१.७), नागपूर ४५.६ (२.८), वाशीम ४३.०, वर्धा ४६.४ (३.६), यवतमाळ ४४.५(२.८). 

उन्हाने होरपळलेली ठिकाणे : चंद्रपूर ४६.६, ब्रह्मपरी ४६.५, वर्धा ४६.४, नागपूर ४५.६, परभणी ४५.६, सोलापूर ४५.१, अमरावती ४५.  वादळी पाऊस, गारपिटीने नुकसान उन्हाने होरपळ वाढली असताना, सायंकाळनंतर ढग गोळा होऊन सांगली, सिंधुदूर्ग, परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, सांगलीतील मिरज, तासगावात गारपीटही झाली. तासगाव तालुक्यात द्राक्ष बागांना गारपिटीचा जबर तडाखा बसला. सावळज परिसरात ३ हजार एकर द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस झाला. पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मॉन्सून जैसे थे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १८) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भाग व्यापला, मात्र त्यानंतर बुधवारपर्यंत (ता. २२) पाच दिवस मॉन्सूनची कोणतही वाटचाल झाली नाही. मॉन्सूनची प्रगती जैसे थे असून, दोन ते तीन दिवसांत उत्तर अंदमानापर्यंत मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com