सरकारने मध्यस्ती करून तोडगा काढला पाहिजे होता

सरकारने मध्यस्थी केली पाहिजे ः शेट्टी
सरकारने मध्यस्थी केली पाहिजे ः शेट्टी

कोल्हापूर : ऊस दरात तोडगा काढण्याऐवजी सरकारला शेतकऱ्यांना रक्तरंजित झालेले किंवा त्यांची फुटलेली डोकी पाहायची आहेत. वास्तविक ऊस दराबाबत सरकारने मध्यस्ती करून तोडगा काढला पाहिजे होता. सरकार यामध्ये लक्ष देत नाही, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता.४) केली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  खासदार शेट्टी म्हणाले, साखर कारखाने वेळेत सुरू झाले पाहिजेत. ऊस तोड रोखल्यानंतर शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. याची जाणीव प्रत्येकाला आहे. पण, शेतकऱ्यांच्या उसाला कमी दर देऊन कारखाने सुरू करणार असतील तर ते चुकीचे आहे. शेतकऱ्याला संघर्षाशिवाय आत्तापर्यंत काहीही मिळालेले नाही. निसर्ग, रोगराई, खळ्यावरच धान्य लुटणारे आणि आता सरकार सोबत संघर्ष करावा लागत आहे. वास्तविक ऊस दराबाबत सरकारने मध्यस्ती करून तोडगा काढला पाहिजे होता. सरकार यामध्ये लक्ष देत नाही. कारण त्यांना शेतकऱ्यांची डोकी फुटलेली बघायची आहेत. गेल्यावर्षीपर्यंत शेतकऱ्यांनीही कारखान्यांना सांभाळून घेतले आहे. कायद्यात नसतानाही एफआरपीची रक्कमही पहिल्यांदा ८० व नंतर २० टक्के घेतली आहे. हा शेतकऱ्यांचा मोठेपणा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com