ऊस परिषद घेण्याचा शेट्टींना अधिकार नाही : रघुनाथदादा

रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटील

कोल्हापूर : "शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी बोगस आहे, कर्जमाफीच्या याच कारभारामुळे लाखो शेतकऱ्यांत असंतोष आहे. सरकारला याचा जाब द्यावा लागले. ३० ऑक्‍टोबरला साखर संकुल येथे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेतली जाणार आहे, मात्र खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षीपेक्षा ८० टक्के एफआरपी दिली, तरी चालेल म्हणून सांगितले, त्या शेट्टींना ऊस परिषद घेण्याचा कोणताही अधिकार नाही,'' असा टोला शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी लगावला.  भारतीय शेतकरी कामकार पक्ष कार्यालयात ‘शिक्षणाचे खासगीकरण'' या विषायावर चर्चा झाली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रघुनाथदादा म्हणाले, "शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याचा जाब द्यावा लागेल. बोगस कर्जमाफीविरुद्ध अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल. बळिराजा मूक मोर्चातर्फे काढलेल्या मोर्चात सुमारे दोनशे ठिकाणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.''  ''शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर ३०२ कलमाखाली जबाबदार धरून खुनाचे गुन्हे नोंद केले. पोलिसांनी यावर कारवाई केली नाही, तर मात्र यावर कोर्टात दाद मागितली जाईल. उसाच्या दरात राज्यातील शेतकऱ्यांना फसवले आहे. गुजरातमध्ये प्रतिटन उसाला ४४४१ रुपये दर दिला जातो. यापेक्षाही उत्तर प्रदेशात चांगला दर दिला. महाराष्ट्रात आता ‘एफआरपी’पेक्षा दर न घेता साखरेच्या दराच्या तुलनेत उसाचा दर घेणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या वर्षी पहिला हप्ता ३५०० हजार रुपये दर मिळालाच पाहिजे.'' 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com