उसाला दर दिला नाही,तर मोठा लढा उभारू : खासदार राजू शेट्टी

खासदार राजू शेट्टी
खासदार राजू शेट्टी

नगर  : नगर जिल्ह्यातील शेतकरी, ऊस उत्पादकांची पिळवणूक अजिबात सहन करणार नाही. यंदाच्या हंगामात उसाला दर दिला नाही, तर मोठा लढा उभारणार असून, कोल्हापूरसारखी ताकद नगरला उभी करणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. २८) इंदोरी फाटा (ता. अकोले, जि. नगर) येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत या वेळी अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पोपळे, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, महिला आघाडी अध्यक्षा रसिका ढगे, रवी मोरे, शरद मरकड, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम आदींसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, की नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला ही अभिमानाची बाब आहे. या कारखान्याने उसाला सर्वांत आधी आणि जास्त दर द्यायला पाहिजे; पण तसे होत नाही. नगरचे साखर कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. आता तसे अजिबात होऊ देणार नाही. कोल्हापूरला २७ आॅक्टोबरला ऊस परिषद होत आहे. त्यात दर जाहीर होईपर्यंत नगरमधील शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देऊ नये. नगर जिल्ह्यात संघटनेची कोल्हापूरसारखी ताकद उभी करणार आहे. दुधाचे अनुदान जमा केले नाही तर पुन्हा लढा उभारणार आहे. नगरच्या कारखानदारांनी सभासदांच्या पैशांतून संस्था उभ्या केल्या. पण नंतर त्या स्वतःच्या नावे करून सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप खासदार शेट्टी यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com