बियाणे कंपन्यांमुळे शेतकरी देशोधडीला ः शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी

अकोला ः कापूसउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारने त्याला मदत दिली नाही. त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहेत. कापूस बियाणे उत्पादक कंपन्यामुळे शेतकरी देशोधडीला लागत असून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. ८) लोकसभेत केली.  या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की कापूसउत्पादक शेतकरी बोंडअळी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या संकटातून जात आहेत. बीटी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन वाढेल असे सांगून सदर बियाणे शेतकऱ्यांना घेण्यास भाग पाडले. मात्र उत्पादन वाढले नाही. त्यातच बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी, कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत.  ‘‘आमचा तंत्रज्ञानाला विरोध नाही; मात्र कंपन्यांनी ज्या पध्दतीने बीटी कापसाची जाहिरातबाजी केली होती त्या प्रमाणात उत्पादन निघत नाही. बियाणे बाजारात आणताना त्यांची तपासणी न करताच बाजारात आणली जातात. त्यामुळे बोगस बियाण्यांचा फटका देखील शेतकऱ्यांना सोसावा लागतो. कंपन्या मात्र हातवर करून मोकळे होतात. बियाणे तपासणी करूनच बाजारात आणले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. या कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांमुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसलेला आहे. या शेतकऱ्यांना केंद्राने तातडीने मदत करावी,’’ अशी मागणी देखील खासदार शेट्टी यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com