‘एफआरपी'चा बदलेला बेस पूर्वीप्रमाणेच ठेवा ः राजू शेट्टी

‘एफआरपी'चा बदलेला बेस पूर्वीप्रमाणेच ठेवा ः राजू शेट्टी
‘एफआरपी'चा बदलेला बेस पूर्वीप्रमाणेच ठेवा ः राजू शेट्टी

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : मोदी सरकारने ‘एफआरपी'चा बेस वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पूर्वीप्रमाणेच एफआरपीचा बेस ९.५० टक्‍के करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांच्याकडे केली. खासदार शेट्टी यांनी दिल्ली येथे शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले.  श्री. शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने यंदाच्या साखर हंगामातील उसाच्या ‘एफआरपी''चा बेस बदलून १० टक्के केला आहे. पूर्वी ‘एफआरपी''चा बेस ९.५० टक्‍के होता, तो दहा टक्‍के केला आहे. सध्या सरकारने दोन हजार ७५० रुपये प्रतिटन दहा टक्‍के रिकव्हरीस ‘एफआरपी'' जाहीर केली. याअगोदर ९.५० टक्‍के बेस होता. या बदलामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन १४५ रुपयांचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादकांचे १३ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान होईल. हा निर्णय म्हणजे साखर कारखानादारांना पाठबळ देणारा आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना याचा सर्वाधिक फटका बसेल.  देशातील इतर राज्यांतील उसाची रिकव्हरी पाहता, महाराष्ट्राची ११.५० टक्‍के रिकव्हरी आहे. १.५ टक्‍केच रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडेल. एकीकडे उसाला आम्ही २०० रुपये दर दिला म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्याकडूनच १४५ रुपयांची कपात करायची. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. हा निर्णय कृषिमूल्य आयोगाने त्वरित मागे घ्यावा व पूर्वीप्रमाणे एफआरपीचा बेस ९.५० टक्‍के करावा, अन्यथा शेतकरी या निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलन करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com